बलुचिस्तानमधील स्वातंत्रलढा चिरडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला विशेषाधिकार   

इस्लामाबाद : बलुचिस्तानमधील स्वातंत्रलढा चिरडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला विशेषाधिकार देण्यात आले आहे. ‘काऊंटर टेररिजम’ विधेयक २०२५ 
ला बलुचिस्तान विधानसभेत हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या कायद्यानुसार पाकिस्तानी लष्कराला कोणत्याही संशयित नागरिकाला अटक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
    
बलुचिस्तानला  पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्याची मागणी बलुच नागरिकांनी लावून धरली आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारच्या विरोधात हिंसक आंदोलनेही सुरू आहेत. पाकिस्तानी सैन्याला बलुच लिबरेशन आर्मी लक्ष्य करत आहे. पाकिस्तानी सैन्याला बलुचिस्तानात होणारा तीव्र विरोध पाहता विधानसभेत    ‘काऊंटर टेररिजम’ विधेयक पारित करण्यात आले. या कायद्यानुसार पाकिस्तानी सैन्याला कोणावरही संशय असेल तर त्याला तातडीने अटक करण्याचा अधिकार दिला आहे. या विधेयकात शंकेच्या आधारे अटक करण्याची परवानगी दिली त्याशिवाय संबंधित व्यक्तीला ३ महिने त्यांच्या ताब्यात ठेवले जाऊ शकते. त्यासाठी संशयितावर कुठलाही आरोप सिद्ध होण्याचीही गरज नाही. 
   
बलुचिस्तान पोलिस आणि सैन्य अभियान यांच्यातील अंतरही या कायद्यामुळे संपले आहे. तपास यंत्रणांना शोध मोहिम राबवणे, अटक करणे, मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यासाठी कोणत्याही न्यायालयाच्या  परवानगीची गरज नाही. त्यामुळे येत्या काळात बलुचिस्तानातील नागरिकांवर  अत्याचार वाढण्याची शक्यता आहे

Related Articles